१२ ऑगस्ट १३४७:- दक्षिण भारतात बहामनी साम्राज्याची स्थापना १२ ऑगस्ट १३४७:- बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला. इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या...
हंसराज, स्वामी हंसराज, स्वामी वेदान्तवेत्ते, धर्मचिंतक, ग्रंथकार जन्मदिनांक : १८०५ मृत्युदिनांक : १८५५ कार्यक्षेत्र : धर्मपरंपरा जन्मस्थळ : परभणी य वनांची राजवट असलेल्या तत्कालीन परभणी नगरात वडील गंगाधरपंत आणि आई रेणुकाबाई यांच्या पोटी श्री हंसराज स्वामी यांचा जन्म झाला. आश्वलायन शाखेचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घराणे; परंतु त्यांची परिस्थिती फारच ओढगस्तीची होती. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना जगण्यासाठी गावोगावी फिरावे लागले. हंसराज स्वामींचे मूळ नाव नारायण. नारायणाचे शिक्षण होत नाही म्हणून आई-वडिलांचा जीव तीळतीळ तुटायचा. नारायण अतिशय देखणा व तेजस्वी होता. बुद्धिमान होता. आणि म्हणूनच रीतसर शिक्षण झाले नसले तरी आकलनशक्ती तेज असलेल्या एकपाठी नारायणाने धूळपाटीवर अक्षर-ओळख करून घेतली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध, दीपरत्नाकर अशी विपुल ग्रंथसंपदा प्रथम वाचून काढली. या बोधामृतानेही त्यांचे समाधान होत नव्हते. आत्मज्ञान होणे महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटे. गुरूंनी ‘तत्त्वमसि’ची ओळख द्यायला पाहिजे ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते अस्वस्थ असत. भौतिक सुखे त्यांना निरस व...
बहमनी सत्तेचा उदय Post published: 21/02/2019 Post author: जयकुमार पाठक Post category: मध्ययुगीन इतिहास Post comments: 1 Comment मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात होते. घियासुद्दिन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक (कार. १३२५–५१) हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याच्या काळात राज्यविस्तार झाला. दिल्लीवरील परकीय आक्रमणांचा धोका टाळण्यासाठी व दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी, असे वाटले. म्हणून त्याने इ. स. १३२७ मध्ये साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली. देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या स्थलांतराचे अनेक दूरगामी परिणाम दक्षिणेच्या राजकारणावर झाले. राजधानी देवगिरी उर्फ दौलताबादला हलविली, तरी मुहम्मदाला वारंवार उत्तरेत जाणे भाग पडत ...
Comments
Post a Comment