कल्याण स्वामी कल्याण स्वामी (मराठी लेखनभेद: कल्याणस्वामी )), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे ( शा.श. १५५८ ), अर्थात इ.स. १६३६... समाधी इ.स.1714; डोमगाव, उस्मानाबाद जिल्हा , महाराष्ट्र ). हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. [ संदर्भ हवा ] . कल्याण स्वामींचे समकालीन व्यक्तीने काढलेले चित्र बालपण व प्रारंभिक जीवन संपादन करा पाराजीपंतानी आपली बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला. मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजीपंत कुलकर्णी हे पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते. तेथे पाराजीपंत (बरवाजीपंत) कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजीपंतांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले झाली. पहिला म्हणजे, अंबाजी (जन्म शा.श. १५५८ म्हणजे इ.स. १६३६ ) व दुसरा दत्तात्रेय. या दोघांना एक बहीणही होती. रामदासस्वामी कीर्तनासाठी कोल्ह...
Comments
Post a Comment